Posts

Showing posts from July, 2020

अग्निदिव्य !

             अग्निदिव्य !         शकीला एका मुस्लिम परिवारात जन्माला आलेली एक चुणचुणीत मुलगी.  लहानपणापासूनच आमची ओळख. तिची  आई आमच्याकडे घरकामाला यायची. आईच बोट धरून येणारी शकीला आणि माझी  लवकरच मैत्री जमली.आईसोबत ती घरी आली की आम्ही मनसोक्त भाहुल्या, खेळभांडे खेळायचो. जवळपास दहावीपर्यंत ती माझ्या संपर्कात होती.  शकीलाच्या परिवारात आणखी तिच्यापेक्षा मोठ्या चार बहिणी होत्या . वडिलांच छत्र लहानपणीच हरवलेले होत . त्यामुळे पाचही मुलींची जवाबदारी तिच्या आईवर होती. असं असतांना चार घराच्या मिळकतीवर चार बहिणीचे लग्न तीने लवकरच उरकवले . तीच घर माझ्या घराजवळच इंदिरानगरातील झोपडपट्टी मध्ये होत. सरकार कडून मिळालेल्या थोड्या जागेत  शकीलाचा पूर्ण परिवार राहायचा. चार घरची धुणीभांडी करून तिच्या आईने अगदी लहान वयातच सर्वांचे लग्न उरकून टाकले होते. त्यामुळे शकिलाचही लग्न उरकवून आपण मोकळं व्हाव  असं तिला वाटायचं . आणि तसा योगही लवकरच आला. एका जवळच्या नातेवाईकासोबत अब्दुल शकीलाच्या घरी काही कामानिमित्य आला असतांना.  ...

एक हात मदतीचा

    एक हात मदतीचा !          मला शिक्षण क्षेत्रात नोकरी करून जवळपास दहा वर्ष पूर्ण झालीत.या दहा वर्षात अनेक विदयार्थी हाताखालून शिकून गेलेत.हालाखीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण  'कमवा आणि शिका' या तत्वावर अवलंबून असते. बरेच विदयार्थी मोल, मजुरी करून आपल्या शिक्षणाची आणि घरची जवाबदारी स्वतः उचलत असतात. शाळेसाठी लागणारे पुस्तके , कपडे, येण्याजाण्याची सोय या सर्व गोष्टी त्यांच्याच  मिळकतीवर अवलंवून असते .असे अनेक विदयार्थी मी बघितले जे स्वतःला स्वतःच घडवितात. बारावीच्या बोर्ड परीक्षेची फी भरायची सोय बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसते. अशा वेळी बरेचदा आमची त्यांना मदत असतेच.त्यांच्यात प्रामाणिकपणा इतका असतो की पैसे येताच  ते परतही करतात.कॉलेजमध्ये सकाळी आलेले बरेच विदयार्थी सुट्टी होताच मिळेल त्या कामावर जात असतात. कुणी घरच्या शेतात आईवडिलांना मदत करतात तर कुणी मोल मजुरी करून घरची आर्थिक परिस्थिती सावरतात. कॉलेजमधून सरळ कामावर जाणाऱ्या मुलांच्या घामाने आणि श्रमाने चिंब भिजलेला शर्ट लवकरच फाटते  आणि मग  त्यावर स...

निर्ढावलेली विकृती

      निर्ढावलेली विकृती      एकतर्फी प्रेम प्रकरणातून हिंगणघाट येथील जळीत काडांची दाह क्षमलेली  नसतांना, छत्तीसगड येथील दोन चौदा वर्षीय विद्यार्थिनींना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच वाचण्यात आली.  बलात्काराच्या प्रयत्नातून यांच्यापेक्षा वरच्या वर्गातील मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. त्या दोघींचाही  80%जळाल्यामूळे मृत्यू झाला.त्यांच्या  मृत्यूपूर्व बयाणात त्यांच्यावर घडलेल्या दुष्कृत्याची  माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते.      अशा  मनाला सुन्न करणाऱ्या घटना वाचल्यात की आपला प्रगत देश कुठल्या मार्गाने जातोय याचं गांभीर्य लक्षात येतं.  समाजात अशा घटना घडणे आता नित्यप्राय झालेल्या आहे.  स्त्रियांवरील अत्याचाराच्या या निरंतर होणाऱ्या घटना अनेक कठोर कायदे करूनही थांबवू  शकलो नाही हे आपल्या देशातील दुर्दैवंच म्हणावं लागेल. स्त्रियांवरील वारंवार घडणाऱ्या घटना या देशाची प्रतिमा कलंकित  करणाऱ्या  तर आहेच पण देशाला देशोधडीला नेणाऱ्या सुद्धा आहेत,हे विसरून चालणारं नाही.आधुनिकतेची  झू...

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा : गुरु शिष्य परंपरेचा गौरव  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेवो महेश्वरा गुरु :साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः    आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी संपूर्ण देशात गुरूंची पुजा केली जाते.महाभारत रचते महर्षी व्यासांच्या काळापासून गुरुपौर्णिमेची परंपरा चालतं आलेली आहे. भारतीय  संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान दिल्या जात.  रामायण, महाभारताच्या काळापासून गुरु शिष्य परंपरा अस्तित्वात आली जी निरंतर टिकून आहे. मानवी जीवनात गुरु शिवाय मार्ग नाही.  गुरु हा मानवी जीवनाला सुवर्णमय करणारा परीस होय.  ज्याच्या सद्गुणी स्पर्शामुळे मानवी जीवन सुसंस्कृत होते. गुरूला परमेश्वरापेक्षाही उच्च कोटीचे स्थान प्राप्त झाले आहे. यामुळे गुरु शिष्याच हे नातं अमौलिक समजल्या जात.     शिक्षकास पूर्वी 'आचार्य ' म्हणतं, आचार्य म्हणजे आचारवान. स्वतः आदर्श जीवन आचरणात आणून विद्यार्थांकडून आचरवून घेणारा तो आचार्य. तर वेदामध्ये गुरूला अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक व अज्ञान दूर करणारा असं म्हटलं आहे.  खरा गुरु...