अशी ही अन्नपूर्णा !!
अन्न हे पूर्णब्रह्म !!अशी ही अन्नपूर्णा!! अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो.ते खरेच आहे.माणसाच जगन हे पूर्णता त्याला मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते .आपल्याला ही ऊर्जा अन्नातून मिळते .दोन वेळच पोटभर जेवन माणसाला सुदृढच बनवीत नाही तर त्याला शांती देते,समाधान देते,जीवनाला बळ देते.म्हणून माणसाच्या आत्माला शांत करायचा दरवाजा थेट जिभेजवळ जातो .पूर्वीच्या काळात माणूस दोन वेळच्या अन्नाची भूक चटणी भाकरीवर भागवायचा.सन,उत्साह,विवाह आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुंचार म्हणून घरात गोडधोड सिजायच.त्यात पारंपारिक पक्वाने केली जात.दिवाळी,दसरा,होळी,पोळा या सनाला घरातील स्त्रियांच्या पक्वानाला आठ दिवसापासून सुरुवात व्हायची.घरात पदार्थ्यांचा सुगंध दळवळायचा.पाहुण्यांची वरदळ राहायची.दिवाळीच्या फराळ करायच्या निमित्याने गावतील पाहुण्यांना मानाने बोलावल्या जायच त्यानिमित्याने बालपणाच्या मैत्रिणींचा माहेरी आल्या की एकमेकांशी भेट व्हायची .एकमेकांची सुखदुःख त्यानिमित्याने वाटली जायची.म्हणून दिवाळीला माहेरी जायची आतुरता,मामाच्या गावाला जायची उत्सुकता मुलांना असायची . ही सगळी परंपरागत मुल्य आपण बघितली ...