Posts

Showing posts from April, 2020

जागतिक पुस्तकं दिन :पुस्तकं माझा मित्र

       जागतिक पुस्तक दिन          २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनी मधील जोहान्स गुटेनबर्ग याने  इ.स.1436 ला मुद्र्णाचा शोध लावला.त्याने अक्षराचे  खिळे तयार करून आपल्याच मुद्राणालयात 'बायबल' ची छपाई केली.त्याबरोबरच  लेखनाचे अनेक दालने खुली झालीत. लिखित, प्रायोगिक तंत्रज्ञानाचे  ज्ञान क्षेत्रे व्यापक बनले.  ज्ञानाच्या या अथांग सागरात अनेक शब्दरूपी मौल्यवान विचार तरंगायला लागले. या शब्दरूपी सागराची रुंदी इतकी विस्तारली  की ज्ञानाच्या, विचारांच्या अनेक शाखा विस्तारल्या आणि त्यात अनेक  ज्ञानयोगी,  विचारवंत, अभ्यासक, तत्वचिंतक, लेखक, साहित्यिक,समीक्षक  इतिहासकार आपली  ज्ञानतृष्णा भागवू लागले.           रानटी अवस्थेत असलेल्या या मानवाने चंद्रावर पाय ठेवण्यापर्यंत जी मजल गाठली व जोकाही आमूलाग्र बदल घडवून आणला तो काही चमत्कार नव्हे, तर...

स्त्री सक्षमीकरण :डॉ बाबासाहेब आंबेडकर

आदरणीय डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रक्रियेतून  स्त्री सक्षमीकरण          डॉ. बाबासाहेबांच्या विचार प्रक्रियेत स्त्री सक्षमीकरणाच्या तळामुळापर्यत आपल्याला जायचं असेल तर प्राचीनकाळापासून स्त्रीच्या दशा आणि दिशा या विषयाकडे  आपल्याला जावे  लागेलं .त्याचाच थोडक्यात परामर्श आपण घेऊयात.  भारतीय संस्कृती ही  पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित असल्यामुळे, सुरवातीपासूनच स्त्री जातीची अवहेलना, उपेक्षा होतांना दिसून येते.पूर्वी पासून  स्त्रीला दुर्गा, काली, चंडी या देवता स्वरूपी स्त्रीयत्वाचे नावं दिलेले असले  तरीही  प्राचीन काळापासून भारतातील स्त्री ही शोषित व अन्यायग्रस्तच राहलेली होती. वेदकाळात स्त्रियांची स्थिती थोडी बरी दिसून येते.  गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, सुलभा या स्त्रिया ब्रह्मवादिनी होत्या.काही अंशी स्त्रीप्रधान संस्कृतीची छापही आपल्याला दिसून येते. म्हणून स्त्री ही सक्षम होती असं आपल्याला म्हणता येणारं नाही.  इतिहास-काळात जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई इ. राजघराण्यातील स्त्रिया शूर  ल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर :महान विभूती

        महामानव :डॉ. बाबासाहेब आंबेडकर          भारतीय संस्कृतीचा  इतिहास अमौलिक आहे. इथे अनेक पराक्रमी राजे, महाराजे, संत महात्मे, क्रांतिवीर, समाजसुधारक, विचारवंत, बुद्धिवंत महान विभूती घडून गेल्यात.अशा महान संस्कृतीत पुन्हा एका महान विभूतीने जन्म घेतला. आपल्या कार्यसिद्धीने समाजाला एक नवी दिशा दिली. नवसमाजाची निर्मिती केली  , नवविचारांची नांदी घालून समजाला नवचेतनेचा श्वास घ्यायला मोकळे केले. मानवावर जुलूम करणारे भेसूर, अन्यायकारी  विचारांची राखरांगोळी करून नवे विचार या मातीत रुजवीले. अमानवीय विचारांना समाजातून हाकलून लावले , समाजातील दहाही दिशा उजळून  संपूर्ण मानवजातीला प्रकाशित करून त्यांच्यात नव चेतनेची उभारणी केली. वर्षोनुवर्षे गुलामगिरीच्या  काळवंडलेल्या,अंधारमय गुहेत खितपत पडलेल्या समाजाला बाहेर  काढून त्यांना स्वयंप्रकाशित केले. ते क्रांतीसूर्य म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचे  विचार म्हणजे अथांग सागरच ....या अथांग सागरात विचारांची इतकी मौल्यवान रत्ने दडून आहेत, की कुठलाही मानव त्या सुवर्णम...

कोरोना एक भीषण युद्ध

               सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर कोरोनाच्या विरोधात  एकच भीषण, महायुद्ध सुरु आहे ;ते म्हणजे 'कोरोना युद्ध' होय. जगाच्या पाठीवर अनेक महायुद्धे  झालीत पण त्या युद्धाचा  उद्देश वेगळा असायचा. देशाच्या परिसीमा वाढविणे, अनेक देश हस्तगत करणे , आर्थिक लूट करणे, दुसऱ्या देशावर राज्य करणे; असे कितीतरी कारणे त्या युद्धामागे असायची. हळूहळू युद्धाचे रूपांतर दहशतवाद, आतंकवाद मध्ये झाले . त्या स्वरक्षणार्थ वेगवेगळे शक्तिशाली अणुबॉंब, हॅड्रोजन बॉंब,  प्रगत अस्त्रेशस्त्रे निर्माण झालीत . अनेक देशानी  अणुबॉंब चाचण्या करून आपल्या शक्तीचे पदर्शन केलेत. आपण किती बलाढ्य, बलशाली आहोत हे दाखविण्याची विविध अणुचाचणी प्रयोग करण्यात आले.  एकमेकांकडे बोक्यासारखे बघून गुरगुरनारे महाबलशाली देश मात्र आज कोरोनाच्या प्रकोपाने असह्य पडलेत, रोज होणारे  मृत्यूचे  तांडव ते थांबवू शकले नाही.  हे युद्ध प्रत्येक राष्ट्रासाठी एक सबक आहे.  या युद्धात ना कुठल्या राष्ट्राचा अणुबॉंब कामी आला ना प्रबळ राष्ट्राची संपत्ती.. एका कोरोना ...