Posts

Showing posts from August, 2024

साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण

      साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण ....       महाराष्ट्राची माती ही थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शने पुलकित झालेली आहे . संत ,पंत आणि तंत साहित्याची खान याचं मातीत रुजली आणि बहरली सुद्धा ... संतांची थोर अभंगे ,पंतांची आख्यानकाव्ये आणि तंत काव्याची ,ढोलकीच्या तालावर थिरकणारी,मदमस्त करणारी धडाकेबाज  लावणी ,पराक्रमाचे गौरवगीत गाजवणारे पोवाडे , महाराष्ट्राच्या मनामनावर आजही राज्य करीत आहे .याचं मराठी साहित्याच्या संस्कारावर मराठी माणूस घडला आणि लढलाही...         मराठी सारस्वत थोर आहे .त्याचा पायाच मुळी  ज्ञानयोगी  ज्ञानेश्वरांनी घातला आहे .आणि म्हणून मराठी भाषेचं सामर्थ्य  आणि गोडवा कायम टिकवून ठेवणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयांच आद्य कर्तव्य आहे .त्याकरिता वाचन संकृती ही विकसित होणे महत्वाचे  आहे .          आज वाचनसंस्कृती विकसित होतं नसली तरी साहित्यिकांच्या झुंडशाहीत कमालीची वाढ होतांना दिसते आहे .म्हणून वाचन संस्कृती विकसित झाली असे आपल्याल...

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर

स्त्री उद्धारक :डॉ .बाबासाहेब आंबेडकर         समाजात प्रस्थापित समाजव्यवस्थेचे सर्वत्र अंधुक धुके पसरले असतांना ,सामाजिक  असमानतेचे  धुके  दूर करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला .ते म्हणजे  थोर भारतीय विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय समाज क्रांतीचे मुकुटमणी, दलितोद्धारक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर....त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क ,अधिकारच नाही तर त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा महत्वपूर्ण विडा उचलला .समाजातील उपेक्षित घटकांना त्यांना न्यायचं मिळवून दिले नाही तर त्यांच्यात आत्मविश्वासाची महत्वपूर्ण फुंकर त्यांनी घातली . स्त्री मुक्तीचे ते पक्के  समर्थक होते.समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर अवलंबून आहे .त्यामुळे त्यांनाही प्रत्येक अधिकार मिळायला हवा ,यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले .समाजातील शोषित स्त्रियांना काळोखाच्या अंधारातून प्रकाशाच्या उजेडात आणणारे  ते  क्रांतिसूर्य होते .ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना  दुय्मम स्थान होते. स्त्रियांना ...

स्त्री मना तुझी कहाणी!

            स्त्री मना तुझी कहाणी!                 मी एक स्त्री म्हणून जेव्हा जेव्हा स्त्री मनाला उलगडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तेव्हा मला याची जाणीव होते. की, स्त्री मनाची खोली छेदन हे सहज शक्य नाही.जसे अथांग सागरातील पाण्याचा अंदाज घेता येत नाही. सागरामध्ये किती मौल्यवान वस्तू, माणिक मोती,वनस्पती दडलेल्या आहे याचा वेध घेणं  शक्य होत नाही.तसे स्त्री मनाच्या खोलीचा अंदाज घेणं अशक्यच म्हणावं लागेल!म्हणून मला सागर  आणि स्त्रीमनाशी तुलना करतांना बरीचशी साम्यता वाटते. खरं तर स्त्री मन हे नाजूक असते, संवेदनशील असते, कमजोर असते, हळव असते असा अनेकांचा अंदाज असतो.पण ते खरे नव्हे.जरी ती शरीराने नाजूक असली तरी मनाने मात्र कणखर असते,मजबूत असते, न खचणारी , अनेक संकटाना, अडचणीला तोंड देण्याची आत्मशक्ती  तिच्यात असते. तिची अंतर्मुखता इतकी प्रगल्भ असते की तिला स्वतःच्या भावना आवरता येते.नियंत्रित करता येते. आपले दुःख,आपल्या भावना, इच्छा बाजूला सारून  इतरांच्या भावनेला प्राधान्य देण्यात तिला समाधान,आनंद वाट...