साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण
साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण .... महाराष्ट्राची माती ही थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शने पुलकित झालेली आहे . संत ,पंत आणि तंत साहित्याची खान याचं मातीत रुजली आणि बहरली सुद्धा ... संतांची थोर अभंगे ,पंतांची आख्यानकाव्ये आणि तंत काव्याची ,ढोलकीच्या तालावर थिरकणारी,मदमस्त करणारी धडाकेबाज लावणी ,पराक्रमाचे गौरवगीत गाजवणारे पोवाडे , महाराष्ट्राच्या मनामनावर आजही राज्य करीत आहे .याचं मराठी साहित्याच्या संस्कारावर मराठी माणूस घडला आणि लढलाही... मराठी सारस्वत थोर आहे .त्याचा पायाच मुळी ज्ञानयोगी ज्ञानेश्वरांनी घातला आहे .आणि म्हणून मराठी भाषेचं सामर्थ्य आणि गोडवा कायम टिकवून ठेवणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयांच आद्य कर्तव्य आहे .त्याकरिता वाचन संकृती ही विकसित होणे महत्वाचे आहे . आज वाचनसंस्कृती विकसित होतं नसली तरी साहित्यिकांच्या झुंडशाहीत कमालीची वाढ होतांना दिसते आहे .म्हणून वाचन संस्कृती विकसित झाली असे आपल्याल...