Posts

Showing posts from January, 2022

अनाथांची माय

अनाथांची माय शोधतांना !        पद्मश्री सिंधूताई सपकाळ अनाथांसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेणाऱ्या माई आज आपल्यात नाहीत.एकचवेळी अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आणि अनेक अनाथांना आपल्या हृदयाशी जोडणाऱ्या हृदयसम्राज्ञी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.न भुतो न भविष्यति.. असेच त्यांचे कार्य आणि कर्तुत्व ! जेव्हा असे महान कर्तृत्ववान व्यक्तीमत्व या समाजात  जन्माला येतात  तेव्हा अमौलिक कार्य सिद्धीस येते. भरकटलेल्या, दिशाहीन समाजाला योग्य दिशादर्शक त्या ठरतात. मरावे परी किर्तिरुपी उरावे.. असे त्यांचे लौकिक असते. अखंडपणे तेवत राहणाऱ्याना दीपस्तंभाप्रमाणे  समाजाला निरंतर कार्यतत्पर आणि प्रकाशमान करत असतात. अशा व्यक्ती लोकांच्या मनात कायम जीवंत असतात. सिंधूताई आपल्यात राहणार आहे युगानुयुगे!              सिंधुताईने आपल्याला भरभरून दिलं. वाईट प्रसंगाशी लढण्याची वृत्ती , माणुसकी, परोपकारी भावना, दया, क्षमा , संस्कार,संवेदनशीलता, जिव्हाळा, प्रेम, मानवता काय काय नाही शिकवून गेल्या त्या आम्हाला..!! आज कुठल्या ग्रंथात, कुठल्या ...

स्वप्नांचे पंख

            उडान स्वप्नांच्या पूर्ततेची !      देशात मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली . ऑगस्ट २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देतांना मुलींच्या विवाह विषयक पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचे जाहीर केले होते. त्याचं पार्श्वभूमीवर मुलीच्या लग्नाचे वय अठरा वरून एकवीस करण्याच्या ठरावाला संसदेतून नुकतीच मंजुरी देण्यात आली.जी अभिनंदनीय आणि स्वागतार्ह आहे.            वयाचे अठरा वर्षे मुलीने पूर्ण केले की मुलीचे लग्न करण्याची घाई घरापासून समाजापर्यंत केली जाते.मग तिचे स्वप्न, ध्येय, शिक्षण सारं काही अर्धवट... आकाशात मुक्त गवसणी घालण्याआधीच तिचे पंख छाटले जावे  तसेच तिला एका चाकोरीबद्ध जीवनाच्या बेडीत अडकाव लागत. अवेळी लग्नाच्या बंधनात स्वतःच्या इच्छा आकांक्षाचा बळी देत समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावाखाली ती बांधली जाते.      अठराव्या वर्षामध्ये शारीरिक दृष्टीनेह...