ऐसे कैसे झाले भोंदू…!!
**ऐसे कैसे जाले भोंदू ..!!** **संत सज्जन दिसतील जेथे ; लाटांगने जावे तेथे**... असे आपले संत सांगून गेलेत , पण ते संत अखंड विश्वशांतीसाठी जप करणारे होते.मानवतेचे मंत्र देणारे होते , स्वत:च ऐहिक सु:ख सोडून मानवतेच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणारे होते .पण ही मानवसेवा कलंकित करून अध्यात्माच्या नावाखाली ढोंगी,पाखंडी,स्वार्थी भोंदू बाबांची गर्दी समाजात वाढलेली आहे. अशाच एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कोट्याधीश विकृत बाबाच म्हणजे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणार आणि कलंकित करणार ठरलेल आहे. त्याच्या विकृतीचा कळस असंख्य मानवजातीला शरमेने मान खाली करायला लावणार आहे.खर तर आपल्या देशात ही घटना काही नवीन नाही.याआधी आसाराम बापू प्रकरण,रामरहीम प्रकरण हे सुद्धा धक्कादायक होते.त्याचीच ही पुनरावृत्ती झाली आहे. महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदू बाबांना जेलची हवा खावी लागली . अध्यात्वाच्या दुवा पुढे ठेऊन दुकानदारी चालवणाऱ्या या विकृत बाबांनी असंख्य महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले.अनेक महिलांचे घेतले आहे . असले किळसवाने क...